Sunday 23 April 2017

समय से पहले और भाग्य से जादा पाने के लिये


‘समय से पहले और भाग्य से जादा किसी को कुछ नहीं मिलता’ यह वाक्य आपने कई बार सुना होगा, पढ़ा होगा. सच तो यह है कि तुम्हारा भाग्य तुम्हारे कर्मों पर निर्भर है. तुम अगर कुछ करोगे ही नहीं, तो तुम्हे कुछ मिलने वाला नहीं है. ना समय से पहले, ना समय पर और बाद में भी. और जितनी जल्दी तुम कुछ अच्छा करोगे उतनी जल्दी तुम्हे उसका अच्छा फल मिलने वाला है. इसलिए हमेशा कुछ अच्छा करते रहो, वह भी बिना समय गवाएं. मैंने अपनी न्यूमरॉलॉजी और मोटीव्हेशन की प्रॅक्टिस में देखा है कि लोगों के काम देरी से होने या काम ही न होने का सब से बडा कारण वे अपने काम के बारे में जादा सिरिअस नहीं होते, कुछ करने में उनकी रूचि नहीं होती और भाग्य पर उनका जादा भरोसा होता है. कबीर जी ने कहा था, कल करे सो आज कर, आज करे सो अब. उनकी इस उक्ति का जो पालन करेगा, उसे समय से पहले और भाग्य से जादा जरुर मिलता रहेगा! –महावीर सांगलीकर

Friday 7 April 2017

देत जावे, येत राहील!

दानत ही तुमच्याकडे किती आहे यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या देण्याच्या मानसिकतेवर असते. एखाद्या लहान मुलाकडे दोनच चॉकलेट्स असतीत तर त्यातलं एक तो दुसऱ्याला खुशीनं देईल. एखादं मूल आपल्याकडचे दोनही चॉकलेट्स देऊन टाकेल. तर दुसरे एखादे मूल त्याच्याकडं भरपूर चॉकलेट्स असूनही त्यातलं एकही दुसऱ्या कोणाला देणार नाही. इथं  ‘मुलांचे पाय पाळण्यात दिसतात’ ही उक्ती लागू पडते. देणारी मुलं, पुढं त्यांच्यावर पालकांचे चुकीचे संस्कार झाले नाहीत तर आपल्या भावी आयुष्यात नक्कीच दानशूर आणि यशस्वी होतील. कारण देणाऱ्यांकडं भरभरून, चोहोबाजूने येत असतं. त्यांच्याकडं असतं म्हणून ते देत नसतात, तर त्यांना देण्याची सवय असते म्हणून त्यांच्याकडं येत असतं. तुम्हीही तुमच्या कमाईतला थोडा भाग नियमित दान करा. हे दान तुम्ही गरजूंना, विद्यार्थ्यांना, अनाथाश्रमाला, संकटग्रस्तांना करा. ते निरपेक्ष बुद्धीनं करा. या दानाचा डांगोरा पिटू नका. मग पहा तुमच्या जीवनात काय क्रांती होते ते!


Wednesday 5 April 2017

चांगलं दिसा!

चांगलं असण्याबरोबरच चांगलं दिसणंही महत्वाचं आहे. तुम्ही कसं रहाता, कसं दिसता यालाही महत्व असतं. हे म्हणजे वस्तूंच्या पॅकिंगसारखं असतं. म्हणजे बाजारातली एखादी वस्तू कितीही चांगली असली पण तिचे पॅकिंग चांगले नसले तर त्या वस्तूला उठाव नसतो. माणसाचं पण तसंच आहे. तुमचा चेहरा उदास असला, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये लोकांना आकर्षित करण्यासारखं कांही नसेल, तुमचे कपडे गबाळ्यासारखे असतील, तुमच्या चालण्यात, बोलण्यात आत्मविश्वास दिसत नसेल तर या जगात तुम्हाला किंमत मिळणार नाही. तुमचं हे दिसणं तुम्ही सुंदर आहात की नाही, काळे आहात की गोरे आहात यावर अवलंबून नाही. एक सुंदर चेहरा उदास असेल तर ती सुंदरता बिघडवतो, तर एक सो-सो चेहरा हसरा असला तर तो तुम्हाला आकर्षित करतो. चांगले कपडे तुम्हाला आणखी आकर्षक बनवतात. तेंव्हा उगीच आपलं ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ असल्या उक्तीला बळी पडू नका, कारण तो एक भंकस आदर्शवाद आहे.      

Tuesday 4 April 2017

दुकानदारी

अनेक दुकानदारांचं गिऱ्हाईकाशी बोलणं, वागणं विचित्र असतं. अशा दुकानदारांच्या तोंडावर प्रसन्नता, हसू या गोष्टी नसतात. चेहऱ्यावर नेहमी बारा वाजलेले असतात. त्यांना दुकानात गिऱ्हाईक येणं म्हणजे एक संकटच वाटत असतं. एखादं गिऱ्हाईक आलं आणि त्यानं एखादी वस्तू मागितली आणि ती नसली तर त्या दुकानदाराची ‘नाही’ म्हणून सांगण्याची पद्धत फार विचित्र असते. विचित्र हातवारे करत, तोंडाने ‘च्यक्क’ असा विचित्र आवाज काढत तो दुकानदार त्या गिऱ्हाईकाला पिटाळून लावतो. सुट्टे पैसे नाहीत म्हणून गिऱ्हाईक नाकारणारे, दुकान बंद होत असताना गिऱ्हाईक आले तर त्याला परत पाठवणारे दुकानदार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. गिऱ्हाईकाचा अपमान करणारे, त्यांच्याशी भांडणे करणारे दुकानदार देखील असतात. असे सगळे दुकानदार दुसरं कांही करता येत नाही म्हणून दुकानदारी करणारे लोक असतात, तसेच ते मनोविकृतही असतात. त्यांच्या या विचित्र वागण्यामागे बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबातले ताणतणाव असतात. अशा दुकानदारांच्यावर मानसोपचार करणे आवश्यक आहे. ज्या दुकानदारांना गिऱ्हाईकाशी कसं वागावं हे कळत नाही, त्यांनी दुकान कायमचे बंद करून कुठेतरी नोकरी पकडावी. नाहीतरी त्यांचं दुकान बंद पडणारच असतं.